15 August Bhashan Marathi | स्वातंत्र्य दिन भाषण
15 August Bhashan Marathi | स्वातंत्र्य दिन भाषण : या दिवशी सर्व व्यक्ती सुंदर पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे परिधान करतात आणि राष्ट्रगीत म्हणतात. शाळा आणि महाविद्यालयांत तसेच काही ऑफिसमध्ये या दिवशी भाषण सुद्धा केलं जातं. आता तुम्हाला देखील या दिवशी सुंदर भाषण करायचे असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही दमदार भाषण तयार केलं आहे.
15 ऑगस्ट फक्त 1 मिनिटाचे भाषण – 15 august speech in marathi
- सर्वांना माझा नमस्कार.
- माझे नाव स्वप्नील आहे.
- आज १५ ऑगस्ट आहे
- प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्या !
- १५ ऑगस्ट हा एक राष्ट्रीय सण आहे.
- या दिवशी आपला भारत स्वतंत्र झाला.
- हा दिवस आपण आनंदाने साजरा करतो.
- अनेक सैनिक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले.
- आपला भारत देश महान आहे.
- मला माझा देश खूप खूप आवडतो.
- जय हिंद,वंदे मातरम् !
Also Read : Independence Day Wishes In Marathi | स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
15 ऑगस्ट सोपे भाषण मराठी – 15 th august speech in marathi
तिरंगा आमुचा मान आहे..
पराक्रमाचे गान आहे !
तिरंगा आमुचा प्राण आहे..
भारताची शान आहे !
सर्वांना माझा नमस्कार.
माझे नाव स्वप्नील आहे.
आज १५ ऑगस्ट ! आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्या !
आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा, सन्मानाचा व अभिमानाचा आहे.
मित्रहो,१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे शॉवस घेतोय ते आपल्या वीरांच्या बलिदाना मुळेच. त्या शूरवीरांना, क्रांतीकारकांना माझा सलाम !
आपला भारत देश हा विविधतेत एकता असलेला अगळा वेगळा देश आहे. आपल्या भारताने विविध क्षेत्रात खूप प्रगती केली आहे.
आपण सर्वांनी आपल्या देशाची एकता व अखंडता ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
तिरंगा झेंडा फडकतो,
सारे जयजयकार बोला !
१५ ऑगस्ट अभिमानाचा,
अपूला देश स्वतंत्र झाला !
जय हिंद ! जय भारत !
|| धन्यवाद ||
Also Read : Lokmanya Tilak Bhashan In Marathi | लोकमान्य टिळक पुण्यतिथिनिमित्त भाषण
15 ऑगस्ट भाषण 3 – 15 august bhashan marathi pdf
आदरणीय प्राचार्य, शिक्षक वर्ग आणि येथे उपस्थित असलेले सर्व पाहुणे तसेच माझ्या सर्व प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वप्रथम, माझ्याकडून तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या भरपूर शुभेच्छा. आज देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. यंदा ‘विकसित भारत’ या थिमवर आपला देशा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.
भारताच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस फार महत्वाचा आहे . २०० वर्षांच्या गुलामगिरीतून भारताला सोडवण्यासाठी अनेक देशप्रेमींनी आपल्या प्राणांची आहूती दिली आहे. स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी काम केलंय.
या सर्वच क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी सर्व भारतीय नागरिकांनी स्वातंत्र्यसैनिकांना नतमस्तक होत आदरांजली वाहिली पाहिजे. तसेच स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावतात. यावेळी ३१ तोफांची सलामी देखील दिली जाते. लष्कराच्या तुकड्यांकडूनही सलामी दिली जाते. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. भाषण संपवताना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय हिंद ! जय भारत !
|| धन्यवाद ||